Saturday, March 2, 2019

वैदिक संस्कृती 

वैदिक संस्कृतीतील लोकांना आर्य असे म्हणत असत. आर्यांनी  वेदांची रचना केली  म्हणून हि संस्कृती वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. वेध हे आपले सर्वात प्राचीन साहित्य मानले जाते, हे वेद ४ प्रकारचे आहेत. अनेक ऋषींनी एकत्र येऊन या  वाङ्‍‍मयाची रचना केली,हे सर्व वेध संस्कृत भाषेतील आहेत. ऋग्वेद हा वेदांपैकी पहिला व मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरुपात आहे, नंतर यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद इ. वेदांची रचना झाली. गंगा यमुनेच्या खोऱ्यात पसरलेल्या वैदिक संस्कृतीतील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. 

         गुरे हि त्यांची संपत्ती होती म्हणून गुरांना चरण्यासाठी मोठमोठी कुरने हवी असत. सप्तसिंधू ची भूमी हि त्यांच्यासाठी पूरक अशीच होती म्हणून त्यांनी इथेच वस्ती स्थापन केली. नंतर च्या आलेल्या टोळ्या गंगा यमुनेच्या परिसरात स्थित  झाल्या. हे लोक निसर्ग प्रेमी होते ते निसर्गातील सूर्य, अग्नी,पर्जन्य, मरुत, आणि इंद्र इ. ते देवता मानत होते. वैदिक संस्कृतीतील लोक टोळ्या टोळ्यांनी राहत असत व ते आपापसात लढाया करत असत. यातील भरत नावाची टोळी सर्वात शूर व पराक्रमी होती या टोळीच्या नावावरून भारत देशाला भारत असे नाव पडले. 

 

  • वेद   आर्यांनी निर्माण केलेली पहिली ग्रंथ रचना म्हणजे वेद हे ग्रंथ ४ प्रकारचे आहे. 

     

    1. ऋग्वेद

      सर्वप्रथम ऋग्वेदाची रचना केली गेली ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी काव्य रूपात रचलेले कवणे होय. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे कवणे आहेत.  

      २. यजुर्वेद 

      यजुर्वेद या ग्रंथात यज्ञात म्हंटले जाणारे  मंत्र आहेत. यज्ञ विधी मध्ये मंत्राचे पठण केव्हा व कसे करायचे याचे या ग्रंथा मध्ये मार्गदर्शन केले आहे. 

      . सामवेद 

      यज्ञविधी मध्ये मंत्र हि ताला सुरात करावी लागत असत ती कशी करावीत याचे मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. 

       . अथर्ववेद 

      आयुष्यात येणारे दुखणे संकटावर मात कशी करायची ते उपाय या ग्रंथात दिले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती हि दिली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे हि मार्गदर्शन यात केले आहे.या वेदात तत्वज्ञानाबरोबरच दैनिक जीवनातील अडचणी, संकटे,पीडा  यांवर उपाय सांगितले आहेत. 

        वेदांच्या रचणे नंतर ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे या ग्रंथाची रचना केली गेली. 

       

      १.  ब्राह्मणग्रंथ

      यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करायचा हे सांगणाऱ्या ग्रंथाला ब्राह्मणग्रंथ असे म्हणतात. 

       

      २. आरण्यके  

      वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जाऊन रचलेल्या ग्रंथाचा समावेश होतो. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक मध्ये मांडलेले आहे. 

       

      ३. उपनिषदे 

      'उपनिषदे' म्हणजे गुरु जवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. जीवनातील काही प्रश्न असे असतात कि ते सहजा सहजी सुटत नाहीत अशा गहन प्रश्नांवर या उपनिषदांमध्ये सखोल चर्चा केलेली आहे. 

       

      •  
    2. कुटुंब व्यवस्था आणि दैनिक जीवन 

      वैदिक काळातील पितृप्रधान व्यवस्था होती. कुटुंबातील करता पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असे त्याला गृहपती असे म्हणत यांचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता. या वैदिक काळात वस्तुविनिमयाची पद्धत रूढ होती. कृष्णल,मान, शतमान अशी वजने त्या काळी वापरत असत. याच काळात एकाच व्यवसायातील कुशल कारागीर एकत्र येऊन आपआपल्या संघटना बनवल्या. अशा संघटनांना श्रेणी असे म्हणत. वैदिक काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यसायावरून ठरत असत. 

             वैदिक काळात मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी होती. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इ. विधवान स्त्रियांचे उल्लेख प्राचीन वाङ्‍‍मयात आढळतात. जन्मापासून मृत्यू पर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे आश्रमव्यवस्था होय. वैदिक काळातील लोक लोकरी आणि आणि सुती वस्त्र वापरीत, तसेच प्राण्यांच्या कातड्यांचा हि उपयोग वस्त्रा साठी करत असत. वैदिक काळात निष्क नावाचा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. अग्नीत हवी अर्पण करण्याच्या क्रियेला यज्ञ असे म्हणत. अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास 'हवि' असे म्हणत. 

          वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे  जाडसर तट्टे लावून  त्याच्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे ‘कूड’होय. या घरांच्या जमिनी  शेणा-मातीने सारवलेली असत. घरासाठी ‘गृह’ किंवा  ‘शाला’ हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. उडीद, मसूर आणि  तीळ तसेच मांस या पदार्थ त्यांच्या आहारात समावेश होता.

         गा्यन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ,रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आलण शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि  मृदंग ही तालवाद्ये ते वापरत असत.
       

      • आश्रमव्यवस्था

      आश्रम व्यवस्था हि चार भागामध्ये विभाजित केले आहे. जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या मानवाला जीवनाचे शंभर वर्षे आयुष्य कल्पून त्याचे ४ भागात विभाजन करण्यात आले ते पुढील प्रमाणे

      १. ब्रह्मचर्याश्रम 

      आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीने अभ्यास करून विद्या संपादन करायची असते. या काळास ब्रह्मचर्याश्रम असे म्हणतात.  

       

       

       २. गृहस्थाश्रम 

                विवाह करून संसार करण्याच्या काळास गृहस्थाश्रम असे म्हणतात. 

      ३. वानप्रस्थाश्रम 

      कटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होन्याची अवस्था म्हणजे  वानप्रस्थाश्रम होय. 

      ४. संन्यासाश्रम 

      संन्यासाश्रम हा आयुष्याचा अखेरचा म्हणजे चौथा टप्पा. संन्यासाश्रमात व्यक्तीने चिंतनात जीवन कंठावे असे मानले जाई. 

       


       

      • शासनव्यवस्था 

      जन च्या प्रमुखाला राजा असे म्हणत. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम  राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती.  राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी  नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधीकारी होत. राज्याच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात सभा आणि समित्या या दोन संस्था होत्या. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास 'सभा' असे म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस 'समिती' असे मनात असत. शासनव्यस्थेमध्ये पुढील काही अधिकाऱ्यांचा समावेश होतो. 

      ग्रामिणी _ ग्रामिणी हा गावाचा प्रमुख अधिकारी असे.  

      ग्रामवादी _ ग्रामिणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी म्हणजे ग्रामवादी. 

      विश् _ अनेक ग्रामांचा समूह म्हणजे विश् होय. 

      जन _ अनेक विश् जन तयार होत असे.

      विश्पती _ अनेक ग्रामांच्या समूहाच्या अधिकाऱ्याला विश्पती असे म्हणत. 

      भागदूध _ कर गोळा करणारा अधिकारी 

Wednesday, February 27, 2019


  1. हडप्पा संस्कृती  (सिंधू संस्कृती)
       (Harappan civilization) 


हडप्पा संस्कृती प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. याचा कालखंड इ. स. पूर्व २७०० ते इ. स. पूर्व १५०० असा मानला जातो. इ. स.१९२१ मध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथे सर्वप्रथम उत्खनन चालू झाले म्हणून  याला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ह्या हडप्पाच्या दक्षिणेस ६५० कि. मी. दूर असलेल्या सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो तसेच पश्चिम भारतात  कालिबंगन, धोलावीरा, दायमाबाद, लोथल,सुरकोठडा इत्यादी ठिकाणी अशाच प्रकारचे अवशेष सापडले. 

              हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य सर्वत्र एकसारखीच आढळतात त्यामध्ये घरबांधणी, नगररचना, सांडपाण्याचा निचरा, मुद्रा, मृतदेह पुरण्याची पद्धत, खेळणी, दागिने, भांडी इ. मध्ये साम्य आढळून येते. हडप्पा संस्कृती हि मुख्यतः सिंधू नदीच्या काठी वसलेले होती  म्हणून याला सिंधू संस्कृती असेही म्हंटले जाते. या संस्कृती चा शोध हा इ.स. १९२० मध्ये जेव्हा लाहोर - मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरु झाले तेव्हा या संस्कृतीच्या प्राचीन विटांचे अवशेष सापडले.  




  • घरे व नगर रचना 


हडप्पा  संस्कृतीचे नगररचना हि प्रगत स्वरूपाची होती, त्यांना उत्तम स्थापत्य कला अवगत होती.हडप्पा संस्कृतीची नगररचना हि प्रशासकीय ईमारती व लोकवस्ती अशा दोन भागात केली होत.  हडप्पा संस्कृतीची प्रामुख्याने  घरे हि भाजक्या विटांनी बनवलेले असत तसेच कच्च्या विटांनी व दगडांमध्ये हि काही घरे बांधलेली आढळून येतात. मधोमध चौक व त्याच्या भोवती घरे बांधलेली असत. घरे हि एक मजली दोन मजली असत.  घराच्या आवारात स्नानगृह, विहिरी, शौचालये होती. ते सांडपाणी वाहून नेण्यासाठी भाजकी पन्हाळी चा उपयोग  करत होते.  सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भाजक्या विटांनी बांधलेली गटारे त्या काळी होती, विशेष म्हणजे ती गटारे झाकलेली असत यावरून ते आरोग्याविषयी किती जागरूक होते हे समजते.  

           रस्ते रुंद व एकमेकांना काटकोनात छेदणारे असत त्यातून तयार झालेल्या चौकोनी मोकळ्या भागात घरे बांधली जात. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे जहाजाचे गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पा कालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते, असे  असले तरी या काळात कोणतीही भव्य मंदिरे किंव्हा तत्सम बांधकामे नव्हती. 





घरांची व्यवस्था 







  • महास्नानगृह 


मोहेंजोदडो येथे एक प्रशस्थ असे स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानगृह  २.५ मी. खोल व त्याची १२ मी. लांबी व मी. रुंदी होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून त्या आतून पक्क्या विटांनी बांधलेली होती तसेच  त्यातील पाणी वेळो वेळी काढण्याची सोय व शुद्ध पाणी आत आणण्याची सोया केली गेली होती. 



महास्नानगृह 




  • तटबंदी 


 नगराच्या सौरक्षणासाठी हडप्पा संस्कृतीमध्ये तटबंदी ची व्यवस्था केली गेली होती. तटबंदी ही भाजलेल्या पक्क्या विटा मध्ये बांधलेली असत. 



  • मुद्रा व भांडी 

हडप्पा संस्कृतीमध्ये मुद्रा ह्या मुख्यतः चौकोनी आकाराच्या होत्या, त्या स्टिएटाईट दगडापासून बनवलेले जात. ह्या मुद्रांवर विविध प्रकारचे प्राणी कोरलेले असत, त्यामध्ये बैल,गेंडा, म्हैस, हत्ती, वाघ ई खरेखुरे प्राण्यांचा  समावेश होतो. 
              हडप्पा मधील उत्खननात विविध प्रकारची व विविध रंगांची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने केली गेलेली नक्षी काम आढळून आले. नक्षीच्या नमुन्यामध्ये माश्यांचे खवले एकात एक गुंतलेली वर्तुळे तसेच पिंपळपान ई. चे नक्षीकाम केलेले दिसून येते.हडप्पा संस्कृतीचे लोक मृत  व्यक्तीचे दफन करताना त्या शवा बरोबर  विविध प्रकारची  व आकाराची भांडी पुरत असत. 



        मुद्रा 




     हडप्पा कालीन भांडी
 





  • लोकजीवन 

हडप्पा संस्कृतीचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. नांगरलेल्या शेताचा पुरावा कालीबंगन  येथे मिळाला आहे. येथील लोक विविध पिकांमध्ये गहू, सातू , नाचणी यांचा समावेश होतो, सातू चे पीक राजस्थान मध्ये तर नाचणी चे पीक गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात  घेतले जात असे. या व्यतिरिक्त वाटाणा, तीळ, मसूर ई. पीके घेतली जात. उत्खननात मिळालेल्या पुतळे पाहिले असता त्यांना कापड विणण्याची कला अवगत होती व ते गुडग्यापर्यंत वस्त्र परिधान करत होते. त्या काळात विविध दागिने वापरले जात असे यामध्ये बांगड्या, कमरपट्टा, गळ्यातील माळा, अंगठ्या, बाजूबंद ई. दागिने स्त्रिया घालत असत. हे दागिने सोने, तांबे, कवड्या, रत्ने, कवडे ई. पासून बनवलेली असत. स्त्रिया बांगडया कोपरापर्यंत घालत असत. सापडलेल्या पुतळ्यांच्या आधारे पुरुष हे केसांचा भांग मधून पाडत असत व कोरलेली दाढी ठेवत. 




 मूर्ती 




हडप्पा संस्कृतीतल दागिने 






  • व्यापार 

हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात तसेच इतर देशात व्यापार करत होते. सिंधू च्या खोऱ्यात उत्तम दर्जाचा कापूस पिकत असे तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप तसेच इजिप्त मध्ये निर्यात होत असे , तसेच सुती कापड पण निर्यात होत असे. दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मानके, मौल्यवान खडे, देवदार लाकूड ई. वस्तू आणल्या जात. हा परदेशांशी चालणार व्यापार खुष्कीच्या तसेच सागरी मार्गाने होत असे. लोथल येथे प्रचंड मोठ्या आकारची गोदी सापडली आहे. या संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे.







  • ऱ्हासाची  करणे 

बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, पुन्हा पुन्हा येणारे महापूर, कमी पर्जन्यमान, नद्या कोरड्या पडणे, भूकंप, व्यापारात होणारी घट, जमिनीची सुपीकता घटली, थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त झाली. या सारख्या कारणांमुळे हडप्पा संस्कृती च्या शहरांचा  ऱ्हास  झाला. 

 सध्या 'हडप्पा' व 'मोहेंजोदडो' हि ठिकाणे पाकिस्तान मध्ये आहेत


Amazon

वैदिक संस्कृती   वैदिक संस्कृतीतील लोकांना आर्य असे म्हणत असत. आर्यांनी  वेदांची रचना केली  म्हणून हि संस्कृती वैदिक संस्कृती म्हणून...

Blog Archive