Saturday, March 2, 2019

वैदिक संस्कृती 

वैदिक संस्कृतीतील लोकांना आर्य असे म्हणत असत. आर्यांनी  वेदांची रचना केली  म्हणून हि संस्कृती वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. वेध हे आपले सर्वात प्राचीन साहित्य मानले जाते, हे वेद ४ प्रकारचे आहेत. अनेक ऋषींनी एकत्र येऊन या  वाङ्‍‍मयाची रचना केली,हे सर्व वेध संस्कृत भाषेतील आहेत. ऋग्वेद हा वेदांपैकी पहिला व मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरुपात आहे, नंतर यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद इ. वेदांची रचना झाली. गंगा यमुनेच्या खोऱ्यात पसरलेल्या वैदिक संस्कृतीतील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. 

         गुरे हि त्यांची संपत्ती होती म्हणून गुरांना चरण्यासाठी मोठमोठी कुरने हवी असत. सप्तसिंधू ची भूमी हि त्यांच्यासाठी पूरक अशीच होती म्हणून त्यांनी इथेच वस्ती स्थापन केली. नंतर च्या आलेल्या टोळ्या गंगा यमुनेच्या परिसरात स्थित  झाल्या. हे लोक निसर्ग प्रेमी होते ते निसर्गातील सूर्य, अग्नी,पर्जन्य, मरुत, आणि इंद्र इ. ते देवता मानत होते. वैदिक संस्कृतीतील लोक टोळ्या टोळ्यांनी राहत असत व ते आपापसात लढाया करत असत. यातील भरत नावाची टोळी सर्वात शूर व पराक्रमी होती या टोळीच्या नावावरून भारत देशाला भारत असे नाव पडले. 

 

  • वेद   आर्यांनी निर्माण केलेली पहिली ग्रंथ रचना म्हणजे वेद हे ग्रंथ ४ प्रकारचे आहे. 

     

    1. ऋग्वेद

      सर्वप्रथम ऋग्वेदाची रचना केली गेली ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी काव्य रूपात रचलेले कवणे होय. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे कवणे आहेत.  

      २. यजुर्वेद 

      यजुर्वेद या ग्रंथात यज्ञात म्हंटले जाणारे  मंत्र आहेत. यज्ञ विधी मध्ये मंत्राचे पठण केव्हा व कसे करायचे याचे या ग्रंथा मध्ये मार्गदर्शन केले आहे. 

      . सामवेद 

      यज्ञविधी मध्ये मंत्र हि ताला सुरात करावी लागत असत ती कशी करावीत याचे मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. 

       . अथर्ववेद 

      आयुष्यात येणारे दुखणे संकटावर मात कशी करायची ते उपाय या ग्रंथात दिले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती हि दिली आहे. राजाने राज्य कसे करावे याचे हि मार्गदर्शन यात केले आहे.या वेदात तत्वज्ञानाबरोबरच दैनिक जीवनातील अडचणी, संकटे,पीडा  यांवर उपाय सांगितले आहेत. 

        वेदांच्या रचणे नंतर ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे या ग्रंथाची रचना केली गेली. 

       

      १.  ब्राह्मणग्रंथ

      यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करायचा हे सांगणाऱ्या ग्रंथाला ब्राह्मणग्रंथ असे म्हणतात. 

       

      २. आरण्यके  

      वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जाऊन रचलेल्या ग्रंथाचा समावेश होतो. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक मध्ये मांडलेले आहे. 

       

      ३. उपनिषदे 

      'उपनिषदे' म्हणजे गुरु जवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. जीवनातील काही प्रश्न असे असतात कि ते सहजा सहजी सुटत नाहीत अशा गहन प्रश्नांवर या उपनिषदांमध्ये सखोल चर्चा केलेली आहे. 

       

      •  
    2. कुटुंब व्यवस्था आणि दैनिक जीवन 

      वैदिक काळातील पितृप्रधान व्यवस्था होती. कुटुंबातील करता पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असे त्याला गृहपती असे म्हणत यांचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता. या वैदिक काळात वस्तुविनिमयाची पद्धत रूढ होती. कृष्णल,मान, शतमान अशी वजने त्या काळी वापरत असत. याच काळात एकाच व्यवसायातील कुशल कारागीर एकत्र येऊन आपआपल्या संघटना बनवल्या. अशा संघटनांना श्रेणी असे म्हणत. वैदिक काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यसायावरून ठरत असत. 

             वैदिक काळात मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी होती. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इ. विधवान स्त्रियांचे उल्लेख प्राचीन वाङ्‍‍मयात आढळतात. जन्मापासून मृत्यू पर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे आश्रमव्यवस्था होय. वैदिक काळातील लोक लोकरी आणि आणि सुती वस्त्र वापरीत, तसेच प्राण्यांच्या कातड्यांचा हि उपयोग वस्त्रा साठी करत असत. वैदिक काळात निष्क नावाचा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. अग्नीत हवी अर्पण करण्याच्या क्रियेला यज्ञ असे म्हणत. अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास 'हवि' असे म्हणत. 

          वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे  जाडसर तट्टे लावून  त्याच्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे ‘कूड’होय. या घरांच्या जमिनी  शेणा-मातीने सारवलेली असत. घरासाठी ‘गृह’ किंवा  ‘शाला’ हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. उडीद, मसूर आणि  तीळ तसेच मांस या पदार्थ त्यांच्या आहारात समावेश होता.

         गा्यन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ,रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आलण शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि  मृदंग ही तालवाद्ये ते वापरत असत.
       

      • आश्रमव्यवस्था

      आश्रम व्यवस्था हि चार भागामध्ये विभाजित केले आहे. जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या मानवाला जीवनाचे शंभर वर्षे आयुष्य कल्पून त्याचे ४ भागात विभाजन करण्यात आले ते पुढील प्रमाणे

      १. ब्रह्मचर्याश्रम 

      आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीने अभ्यास करून विद्या संपादन करायची असते. या काळास ब्रह्मचर्याश्रम असे म्हणतात.  

       

       

       २. गृहस्थाश्रम 

                विवाह करून संसार करण्याच्या काळास गृहस्थाश्रम असे म्हणतात. 

      ३. वानप्रस्थाश्रम 

      कटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होन्याची अवस्था म्हणजे  वानप्रस्थाश्रम होय. 

      ४. संन्यासाश्रम 

      संन्यासाश्रम हा आयुष्याचा अखेरचा म्हणजे चौथा टप्पा. संन्यासाश्रमात व्यक्तीने चिंतनात जीवन कंठावे असे मानले जाई. 

       


       

      • शासनव्यवस्था 

      जन च्या प्रमुखाला राजा असे म्हणत. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम  राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती.  राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी  नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधीकारी होत. राज्याच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात सभा आणि समित्या या दोन संस्था होत्या. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास 'सभा' असे म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस 'समिती' असे मनात असत. शासनव्यस्थेमध्ये पुढील काही अधिकाऱ्यांचा समावेश होतो. 

      ग्रामिणी _ ग्रामिणी हा गावाचा प्रमुख अधिकारी असे.  

      ग्रामवादी _ ग्रामिणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी म्हणजे ग्रामवादी. 

      विश् _ अनेक ग्रामांचा समूह म्हणजे विश् होय. 

      जन _ अनेक विश् जन तयार होत असे.

      विश्पती _ अनेक ग्रामांच्या समूहाच्या अधिकाऱ्याला विश्पती असे म्हणत. 

      भागदूध _ कर गोळा करणारा अधिकारी 

Amazon

वैदिक संस्कृती   वैदिक संस्कृतीतील लोकांना आर्य असे म्हणत असत. आर्यांनी  वेदांची रचना केली  म्हणून हि संस्कृती वैदिक संस्कृती म्हणून...

Blog Archive